TOWARDS APPLIED EDUCATION

                                                  TOWARDS APPLIED EDUCATION
                                                           भाग १ - एकदा विचार करा
   मागील काही दशकांपासून भारताने विविध क्षेत्रात प्रगती केली आहे .  स्वतंत्र झाल्यानंतर  आपण बऱ्याच सुधारणा घडवून आणल्या त्यामध्ये आद्योगिक , लोकसंख्या ,कृषी , साधारण गरजा या सारख्या गोष्टी आपण पूर्ण करत आहोत . पण तरीही खंत आहेच . काही गोष्टींमध्ये भारत खूपच मागे आहे . भारताला आपण जेंव्हा एक विकसनशील राष्ट्र म्हणून पाहतो तेंव्हा आपण सर्व पद्धतीने विचार करायला हवा .
   जेंव्हा आपण भारताला दुसऱ्या देशांसोबत तुलना करतो तेंव्हा आपण शिक्षण प्रणालीची  तुलना अधिक केली पाहिजे जापान सारखे लहान देश त्यांच्या देशात एवढ्या नैसर्गिक हानि नंतर सुधा लवकरात लवकर स्वताला सावरतात।  पण  आपल्या लोकांनमधे राज्य सरकारकडून किती  केन्द्राकडून किती नाहीतर आंदोलन पण  असा का ? मी  खर सांगू आपल्या एजुकेशन प्रणालीने लोकाना फ़क्त विरोध मोर्चे आंदोलन आणि नौकर बनवायला शिकविले आहे. आहो आपल्या   देशाला उच्च शिक्षणाचे डोहाळे लागले आहे जो तो फक्त शिकायचे अरे पण  कशासाठी ? आणि तू शिकतोय तरी काय ? मास्टर इन हे हे ? पीएचडी इन हे हे ? आणि एवढा शिकून काय करणार "मला कोणी नौकरी देता का नौकरी " म्हणजे आपण करतोय काय उच्च शिक्षणाची फालतू मिजास , आहो  उच्च शिक्षण  घेण्याबाबत सुद्धा काही प्रश्न नाही पण एवढा शिकूण सुध्दा प्रोडक्टिविटी शुन्य , मैनजमेंट शुन्य , नुसतीच मिजास ,
    मी  एक जापानी डॉक्यूमेंट्री पाहत  होतो त्यामधे एवढ्या लहान लहान मुलांची  प्रोडक्टीविटी , मैनजमेंट पहा आणि आपल्या इथे पहा आपल्या इथल्या राजकुमारांचा , राजकुमारींचा प्रोजेक्ट कोण बनवते त्यांचे पिताश्री मातोश्री।  आहो मग मुलाना शाळेत कशाला  पाठवता तुम्हीच  जा  ना।
   आता अजुन एक म्हणजे आपल्या इथे केजी इंग्लिश मैडियम हे एक नविन प्रोजेक्ट सुरु होताना दिसतात। इथे असे  दिसून आले  की पालकाना असे वाटते  की  त्यांचा पाल्य इंलिश मैडियमला नसेल तर त्यांची इज्जत कमी होते।  हास्यपद आहे पण तितकेच गंभीरत आहे बर नव्या भारताची नवी पिढी आपण उच्च , नीच , इज्ज़त या वर उभे करतोय। म्हणजे आपन असा बोलायचे का मराठी  मैडियम किंवा सरकारी शाळेतून शिकणारा मुलगा प्रोडक्टिव नाहिये। म्हणजे आपण आपल्या लोकनाच कमी लेखतोय।  आणि खुप जनांच लक्ष नाहिये मराठी शाळेतली मुले आत्ताच्या अश्या वातावरणामुळे बोलतात " हम तो बिघडे ही है तो सुधर के  क्या करेंगे " मला कधी  कधी असा  वाटता आता शिक्षणामधेसुद्धा वर्ण व्यवस्था तैयार होईल। आणि याच एकच कारण आहे आपल्या भारतीयांचा भड़क पणा , नुसती पोकळ फुशारकी आणि तोच गुण या नविन पीढ़ी मधे पसरतोय। मुले बोलताना सुद्धा क्राइम सारखा विषय घेऊन बोलतात गप्पा मारतात ,कारण आपण त्याना तेच देत आहोत।  
  जो पर्यन्त आपल्या लोकांमधे इक्वलिटी येणार नाहीं तो पर्यन्त तुम्ही भारतपुढे जाईल असा विचार पण  करू नका। आपल्या शिक्षण प्रणाली मधे बदल हवा आणि तो वैद्यानिक , सामाईक हवा। तुम्ही  थोड़ा विचार करा।

  पुढील भाग  उद्या -                                                         
                                                                                                                 आपला -       चैतन्य पुरी


Comments

  1. Ho sir Khara aahe aaplya shikshan padhatila badlayala hava khup chhan vichar aahet aamhi pudhil bhagachi vat pahat aahot
    Aamhi nakkich sudharnecha praytna Karu

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Ambitious Success Point

How to prepare for NDA & NA?

AFCAT (1) 2024 Notification [Eligibility, syllabus and exam date] By Chaitanya sir